Thursday, 24 July 2014

स्वभाव

आज वडिलांनी सांगितलेली एक गोष्ट आठवते .
दोन शेजारी राहणार्या बायका असतात आणि मैत्रिणी पण .
एक जरा नेहमी त्रागा करणारी आणि एक शांत,
त्याच्यात वाद होतो मग दोघी एकमेकीचे तोंड बघयला तयार नसतात
पण त्रागा करणारी मात्र काही न काही कारणानी तिला त्रास देत राहते .
मग त्याचे नेहमी भांडण आणि लोकंची करमणूक .
शांत बाईला काय करावे समजत नाही .मग तिला तिचे वडील
एक आयडिया देतात.जेव्हा समोरची बाई तुला काही बोलणार तेव्हा तिला काही उत्तर
दयाचे नाही फक्त तिचा कडे बघून ठेंगा {अंगठा }दाखवायचा . मग बघ .
दुसर्या दिवसा पासून ती तसेच करते समोरची काही बोलु लागली कि
न बोलता तिला फक्त ठेंगा दाखवायची .
याचा परिणाम समोरील बाई खूप चिडायची आणि अजून आक्रस्ताळेपणा
करायची याचा परिणाम काही दिवसांनी लोकना वाटायला लागले .
समोरील बाई काही बोलत नाही ती तर शांत आहे म्हणजे .
तिची काही चूक नाही आहे .आणि लोक मग त्रागा करणर्या बाईला
नावे ठेवायला लागली .तिच्या पासून दूर राहायला लागले .
याचा परिणाम ती सगळा राग काही झाले तरी शांत बाई या गोष्टीला
जबाबदार आहे असा आरडाओरडा करयला लागली .
उलट शांत बाई सगळ्या लोकांना आवडायला लागली .
{सध्या काही नेत्याचे जे चालू आहे त्या वरून हि गोष्ट आठवली
आता तुम्हीच ठरवा कोण ते }

No comments:

Post a Comment